श्री गजानन विजय ग्रंथ हे केवळ एक संतचरित्र नाही, तर भक्तांच्या अंतर्यामाला स्पर्श करणारे, आत्मज्ञानाच्या वाटेवर घेऊन जाणारे दिव्य शास्त्र आहे. दासगणू महाराजांनी हा ग्रंथ लिहिताना भक्ताच्या हृदयातील शंका, विश्वास आणि उत्कंठा यांचा एक भावपूर्ण संगम उभा केला आहे. पहिल्या अध्यायात महाराजांचा पहिला दिव्य दर्शनप्रसंग वर्णन केला आहे. हा प्रसंग म्हणजे भक्तीच्या गूढतेचा आरंभबिंदू आहे. महाराज एका निराकार, संन्यासीवेषातील माणसाप्रमाणे शेगावमध्ये अचानक प्रकट झाले. त्यांनी कोणतेही तांत्रिक चमत्कार केले नाहीत, पण त्यांचा तेजोमय, निर्मळ चेहरा आणि गूढ मौन, हेच त्यांच्या अद्भुततेचं प्रतीक ठरलं. त्यांचे शरीर रेखीव होते, पण सामान्य नव्हते. डोळ्यांत करुणा आणि अंतरंगात तपश्चर्या होती. त्यांनी कोणालाही आपली ओळख सांगितली नाही, तरी शेगावचे लोक त्यांच्या चरणी ओढले गेले. हा प्रसंग सांगतो की ईश्वरत्व हे प्रचाराने नव्हे, तर स्पंदनांनी ओळखलं जातं.
कविता – "गजानना तू..."
परिचय लेख: श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय पहिला
श्री गजानन विजय ग्रंथ हे केवळ एक संतचरित्र नाही, तर भक्तांच्या अंतर्यामाला
स्पर्श करणारे, आत्मज्ञानाच्या वाटेवर घेऊन जाणारे दिव्य शास्त्र आहे. दासगणू महाराजांनी हा ग्रंथ लिहिताना भक्ताच्या हृदयातील शंका, विश्वास आणि उत्कंठा यांचा एक
भावपूर्ण संगम उभा केला आहे. पहिल्या अध्यायात महाराजांचा पहिला दिव्य दर्शनप्रसंग वर्णन केला आहे. हा प्रसंग म्हणजे भक्तीच्या गूढतेचा आरंभबिंदू आहे. महाराज एका
निराकार, संन्यासीवेषातील माणसाप्रमाणे शेगावमध्ये अचानक प्रकट झाले. त्यांनी कोणतेही तांत्रिक चमत्कार केले नाहीत, पण त्यांचा तेजोमय, निर्मळ चेहरा आणि गूढ मौन,
हेच त्यांच्या अद्भुततेचं प्रतीक ठरलं. त्यांचे शरीर रेखीव होते, पण सामान्य नव्हते. डोळ्यांत करुणा आणि अंतरंगात तपश्चर्या होती. त्यांनी कोणालाही आपली ओळख
सांगितली नाही, तरी शेगावचे लोक त्यांच्या चरणी ओढले गेले. हा प्रसंग सांगतो की ईश्वरत्व हे प्रचाराने नव्हे, तर स्पंदनांनी ओळखलं जातं.
पहिल्या अध्यायात आपण भगवंताच्या अवताराची नोंद घेतो. हा अध्याय भक्तासाठी नवचैतन्याची स्फूर्ती आहे. ज्यांना वाटतं की आपलं जीवन कोरडं झालंय, अंधार दाटलाय — त्यांना हा अध्याय एक नवा प्रकाश देतो, गजानन महाराजांच्या दर्शनाने आत्मशुद्धीची पहिली झलक मिळते. या पहिल्या अध्यायातून गजानन महाराजांची प्रकटलीली लीलामय साक्षात्कारी छाया आपल्याला मौनातूनही अध्यात्म शिकवते. भक्तीची ही वाट काही केवळ कथा नसून, ती एक अनुभूती आहे – जी हृदयात गडद होत जाते, जेव्हा गजानन माऊली समोर प्रकट होते. विजयभास्कर अनुभवतो – त्या मौनाच्या प्रसादात अंतर्मन शांत होतं…
कविता – "गजानना तू..."
गजानना तू मौनात आला,
माझ्या अंतःकरणात गूंज झाला,
वेडी नजर शोधत राहिली तुला,
तुच साक्षात पांडुरंगा झाला...
दगडांमध्ये ओळखली ज्योती,
तुझ्या चरणांशी मी हरवून गेलो,
भेट तुझी ना शब्दांमध्ये सामावली,
माझ्या अस्तित्वालाच तु भेटलो...
चाललो होतो वाटा अंधाराच्या,
तू दीप लावला माझ्या अंतरीचा,
शब्द विरले, श्वास थांबले,
सावली झाली तू माझ्या जीवनाची...
जिथे अंत होते, तिथे तू सुरु,
जिथे मी संपतो, तिथे तू भरु,
असंच तुझं सामर्थ्य वाटतं मनात,
विजयभास्कर अनुभवतो – तूच माझा आत्मवेदना शमवणारा मंत्र...